शेतकरी आत्महत्येची 13 प्रकरणे मदतीकरीता निकाली Ø    अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आढावा

शेतकरी आत्महत्येची 13 प्रकरणे मदतीकरीता निकाली

Ø    अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला आढावा

चंद्रपूर, दि. 17: जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी  आत्महत्येची एकूण 20 प्रकरणे समितीपुढे ठेवण्यात आली. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली  घेण्यात आलेल्या या बैठकीत 13 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 7 प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहे.

अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडलेल्या आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, नायब तहसिलदार गिता उत्तरवार, पोलिस उपनिरीक्षक दौलत इष्टाम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाके, विस्तार अधिकारी (कृषि) उमेश शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी शंकर लोडे, महसूल सहाय्यक प्रमोद गेडाम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेतीमध्ये सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा तगादा या तीन प्रमुख कारणांपैकी शेतकरी आत्महत्या झाली असल्यास संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते.