पुरोगामी साहित्य संसद आणि पत्रकार संघाच्या वतीने आयोजित काव्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

पुरोगामी साहित्य संसद आणि पत्रकार संघाच्या वतीने आयोजित काव्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

४० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग !

चंद्रपूर (प्रतिनिधी)लयास चाललेली वाचन आणि लेखन संस्कृती कायम राहावी,नव्या दमाचे कवी-साहित्यिक निर्माण व्हावे या हेतूने पुरोगामी साहित्य संसद,जिल्हा चंद्रपूर आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाच्या औचित्याने चंद्रपूर जिल्हास्थरिय आंतर महाविद्यालयीन काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. “देशाची शान,भारतीय संविधान” असा या काव्य स्पर्धेचा विषय विषय होता,जिल्ह्यातुन ४० महाविद्यालयिन विद्यार्थी-विद्यार्थिनीनी स्पर्धेत भाग घेतला.
दिनांक २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ११:३० वाजता श्रमिक पत्रकार भवन,(वरोरा नाका)चंद्रपूर येथे या काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रसिद्ध अधिवक्ते एड.राजेश सिंग होते.तर कार्यक्रमाचे उत्घाटन साहित्य संसदेचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या हस्ते करण्यात आले,पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ संघटक निलेश ठाकरे,पुरोगामी साहित्य संसदेच्या जिल्हाध्यक्ष एड.योगिता रायपुरे,कार्याध्यक्ष विजय भासारकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.आंबेडकर, थोर विचारवन्त,जेष्ठ पत्रकार प्रबोधनकार ठाकरे,साहित्यिक,पत्रकार आचार्य अत्रे,वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रजवलीत करून कार्यक्रमाचे उत्घाटन करण्यात आले.


प्रथम,द्वितीय,तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना ३ हजार,२ हजार,१ हजार रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह,व प्रशिस्ती पत्रक देण्यात आले.या स्पर्धेत पहिला क्रमांक शिवाजी महाविद्यालयातील सुरज पचारे यांनी,दुसरा क्रमांक सर्वोदय महाविद्यालय गोंडपीपरी यांनी,तर तिसरा क्रमांक चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी आलम हिने पटकावला.प्रोत्साहन पर पुरस्कार शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील प्रतीक्षा वासनिक या विद्यार्थीला देण्यात आला.
यावेळी परीक्षण म्हणून लाभलेले नरेशकुमार बोरीकर, विजय वाटेवर,प्रदीप देशमुख,मधुकर दुफारे यांनी उत्तम निकाल दिला.स्पर्धे दरम्यान नरेंद्र सोनारकर,विजय भासारकर सर,एड.योगिता रायपुरे,मृणाल कांबळे,नरेशकुमार बोरीकर,पवन भगत,सविता भोयर,हेमा लांजेवार,संगीता घोडेस्वार, इत्यादींनी आपल्या दर्जेदार कविता सादर करून स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवियत्री सीमा भासारकर यांनी तर आभार मृणाल कांबळे यांनी मानले.
या कार्यक्रमाला स्पर्धकांसह कवी, रसिकांनी भरगच्च हजेरी लावली होती,हे विशेष!