डेंग्यु आजाराबाबत नागरीकांनी योग्य काळजी घेतल्यास तो टाळता येवु शकतो- डॉ. दावल श्रीहरी साळवे

डेंग्यु आजाराबाबत नागरीकांनी योग्य काळजी घेतल्यास तो टाळता येवु शकतो …. डॉ. दावल श्रीहरी साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली

डेंग्यु आजाराबाबत लोकांनी घाबरून न जाता योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजने सोबत योग्य आहार, आराम व स्वच्छता तसेच वेळीच औषधोपचार या त्रिसुत्रीचा वापर केल्यास निश्चितच डेग्यु या आजारावर मात करता येवु शकतो. पावसाळयाच्या दिवसात डेंग्यूची लागण व प्रसार रोखण्यासाठी सर्वांनीच दक्ष राहण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली डॉ. दावल श्रीहरी साळवे यांनी जनतेस केलेले आहे.

डेंग्यु हा किटकजन्य आजार असुन तो विषाणु पासुन पसरत असतो.डेंग्यु या आजाराचा प्रसार एडिस ईजिप्ती या डासापासुन होत असतो.हा डास प्रामुख्याने दिवसा चावत असतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असते. त्यामुळे आपल्या घरातील कुंडया, कुलर, रिकामे टायर, फ्रिज च्या मागे घरावरील छतावर पाणी ७ दिवसापेक्षा जास्त पाणी साचणार नाही याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. आरोग्य विभागामार्फत डेंग्यु या आजाराच्या प्रतिबंधासाठी गावा गावामध्ये ताप सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत करण्यात येत आहे. तसेच किटकजन्य सर्वेक्षणामध्ये घरातील दुषित कंटेनर शोधुन ते रिकामे केल्या जात आहे.तसेच तापच्या रुग्णावर वेळीच उपचार करून गंभीर आजाराच्या रुग्णांना वेळीच सदंर्भ सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. पंचायत विभाग मार्फत ग्रामपंचायती व्दारा धुर फवारणी, पिण्याचे पाण्याचे निर्जंतुकीकरण केल्या जात आहे.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह हे वेळोवेळी सर्व विभागाच्या

विभाग प्रमुखाची व्हि. सी. व्दारा आढावा घेवुन पावसाळयाचे दिवस असल्याने प्रशासनाने वेळीच

उपाय योजना कराव्या याबाबत मार्गदर्शन करित आहेत. आरोग्य विभागा सोबत ईतर

विभागांनी समन्वय साधुन जिल्हयातील डेंग्यु मलेरीया या आजारावर नियंत्रणा करिता प्रयत्न

करावे अशा सुचना देण्यात आलेल्या आहे. नुकतेच त्यांनी सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम

भागातील प्राथमिक आरोग्य केन्द्र, मोयाबीन पेठा येथे भेट देवुन आरोग्य विषयक बाबीचा

आढावा घेतला.

डेंग्यु या आजाराची प्रमुख लक्षणे

> तिवर ताप

> तिवर डोके दुखी,

डोळयांच्या खोबनीत वेदना होणे,

> सांधे दुखी

अंगावर पुरळ येणे,

> भूक मंदावने

> उलट्या होणे.

> प्रसंगी उलटीमधुन रक्त येणे,

नाकातोंडातून, हिरडयातून रक्त येणे

> रक्त मिश्रीत संडास होणे.

ग्रामिण वरील लक्षणे आढल्यास नागरीकांनी नजीकच्या, दवाखान्यात, रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केन्द्र, उपकेन्द्र, आपला दवाखाना येथे जावून वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घेण्यात यावा.

डेंग्यू या आजराला टाळण्याकरिता नागरीकांनी खालील उपाययोजनेचे पालन करावे.

आठवडयातून एकदा कोरडा दिवस पाळवा.

> दर आठवडयाला घरातील पाण्याची भांडी रिकामे करून स्वच्छ घासुन पुसुन कोरडी करावी

> जुने टायर, नारळाचे टरफल, प्लास्टीकच्या वस्तु, पाणी साचु शकेल अशा अशा निरपयोगी वस्तु घराभोवती साठु देवु नका. फुटलेल्या बाटल्या अशा निरपयोगी

> घरातील फुलदाण्या कुलर फ्रिज यामध्ये साचलेले पाणी दर २ ते ३ दिवसांनी काढावे.

> संडासच्या वेन्ट पाईपला जाळी बांधावी.

• झोपतांना मच्छर दाणीचा वापर करावा.