चार मोटर वाहन अपघात प्रकरणी 32 लाखांची नुकसान भरपाई

चार मोटर वाहन अपघात प्रकरणी 32 लाखांची नुकसान भरपाई

 

Ø सुट्टीच्याही दिवशी विशेष लोक अदालत

 

चंद्रपूर, दि. 19 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या किमान समान कार्यक्रमानुसार जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपूर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनानुसार रविवारी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

 

यात मोटार वाहन अपघात प्रकरणे, भू – संपादन प्रकरणे व कौटुंबिक वाद प्रकरण असे एकूण 150 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 4 मोटर वाहन अपघात प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई 32 लक्ष रुपये देण्यात आली. तसेच एक कौटुंबिक प्रकरण निकाली काढण्यात आले.

 

सदर लोक अदालतसाठी पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश 2, पांडुरंग भोसले तर सदस्य म्हणून वकील ए.आर. पाटील होत्या. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी उपस्थित होते.