24 तासात एकही मृत्यु नाही, 112 कोरोनामुक्त Ø 13 पॉझिटिव्ह, ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 229

24 तासात एकही मृत्यु नाही, 112 कोरोनामुक्त

Ø 13 पॉझिटिव्ह, ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 229

चंद्रपूर,दि. 29 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 112 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 13 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. बाधित आलेल्या 13 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 5, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 1, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 1, नागभीड 0, सिंदेवाही 0, मूल 0, सावली 1, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 0, राजूरा 2, चिमूर 0, वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 664 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 908 झाली आहे. सध्या 229  बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 56 हजार 682 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 69 हजार 295 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1527 बाधितांचे मृत्यू  झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.