महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019- अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शेतकरी आधार प्रमाणिकरण करणेबाबत

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019- अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शेतकरी आधार प्रमाणिकरण करणेबाबत

 

-गडचिरोली, दि.28:महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना – 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेबाबत दि.29 जुलै 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.सन 2017-18,सन 2018-19 व सन 2019-20 या आर्थिक वर्षात घेतलेल्या कर्जापैकी दोन वर्षाच्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.या योजनेत जास्तीत जास्त़ रु.50 हजार रुपये पर्यंत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.या तीन वर्षापैकी शेवटच्या वर्षात जे कर्ज घेतलेले आहे.त्या वर्षाच्या कर्जाची मुददल रक्क़म विचारात घेतली जाणारआहे.

 

या योजने अंतर्गत जिल्हयातील जिल्हा मध्य़वर्ती सहकारी बँक,सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बँका यांनी या योजनेत पात्र असलेल्या खातेदारांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरलेली आहे. या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची विशिष्ट़ क्रमांकासह (V-K लिस्ट़) तृतीय यादी दि.26 डिसेंबर,2022 रोजी संबंधीत बँका,जिल्हा उपनिबंधक,व तालुका सहाय्य़क निबंधक कार्यालयात तसेच गाव चावडी,ग्रामपंचायत,विकास संस्था येथे प्रसिध्द़ करण्यात आलेली आहे.तरी त्यात नमुद असलेले शेतकरी लाभार्थी यांनी संबंधीत बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणिकरण करावयाचे आहे.

 

आधार प्रमाणिकरणानंतर पात्र लाभार्थ्यांची प्रोत्साहनपर लाभाची रक्क़म त्यांच्या बँकेच्या सेव्हिंग खात्यावर जमा होणार आहे.आधार प्रमाणिकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्क़म चुकली असेल,तर त्या बाबत त्या शेतकऱ्याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवावयाची आहे,अशा प्राप्त़ होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या तर तालुकास्त़रावर संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

 

तरी,ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करुन घेणे आवश्य़क असल्याने तालुक्यातील आपले सरकार/सी.एस.सीसेंटर/ संग्राम केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.असे जाहिरआवाहन जिल्हाधिकारी,गडचिरोली व जिल्हाउपनिबंधक,सहकारीसंस्था, गडचिरोली यांनी केले आहे.