बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागातील विकास कामांसाठी 55 कोटी 50 लक्ष मंजूर
Ø वन व सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित
चंद्रपूर दि. 23 ऑगस्ट : राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी 55 कोटी 50 लक्ष रुपयांच्या विकास कामांना मंजूरी मिळाली आहे.
ग्रामीण भागातील जनतेची, रस्ते व पुलासंदर्भातील मागणी लक्षात घेता श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. जुलै 2022 च्या पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर विकासकामांमध्ये प्रामुख्याने बल्लारपूर तालुक्यातील मानोरा-कवडजई-कोठारी रस्त्याची सुधारणा 6 कोटी रुपये, माना-नांदगांव-विसापूर रस्त्याची सुधारणा 3 कोटी 50 लक्ष, चंद्रपूर तालुक्यातील मरारसावरी-नागाळा रस्त्यावर अंधारी नदीवरील मोठया पुलाच्या पोचमार्गाकरीता भुसंपादन करणे 50 लक्ष, चंद्रपूर तालुक्यातील तालुका सीमा ते मुल तालुक्यातील टेकाडी-चिमढा-आकापूर-दत्तमंदीर-ताडाळा-हळदी-दहेगांव-मानकापूर-नलेश्वर-खालवसपेठ-चिरोली-टोलेवाही-नागाळा रस्त्याची सुधारणा 4 कोटी 50लक्ष, दुर्गापूर-सिनाळा-वरवट-चोरगांव-मामला-बोर्डा-वलन या रस्त्याची सुधारणा 4 कोटी रुपये.
मुल तालुक्यातील उमरी तुकूम-आंबेधानोरा-डोंगरहळदी-सुशी-नलेश्वर-मानकापूर-हळदी-चिचाळा-फिस्कुटी-चांदापूर रस्त्याची सुधारणा 1 कोटी 80 लक्ष, पेटगांव-भादुर्णी-मारोडा-मुल-चिचाळा-भेजगांव रस्त्याची सुधारणा 19 कोटी, पेटगांव-राजोली-पाथरी रस्त्याची सुधारणा करणे 3 कोटी 90 लक्ष, पोंभुर्णा तालुक्यातील वडकुली-चेक बल्लारपूर-चिंतलधाबा-केमारा-भटारी ते नवीन राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा 3 कोटी, टेकाडी-चिमढा-आकापूर-दत्तमंदीर-ताडाळा-हळदी-दहेगांव-मानकापूर-नलेश्वर-खालवसपेठ-चिरोली-टोलेवाही-नागाळा या रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे 2 कोटी, मुल तालुक्यातील नवेगांव-गांगलवाडी-भादुर्णी-पडझरी-सोमनाथ-मारोडा या रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे 1 कोटी 80 लक्ष, एमआयडीसी-दाताळा चंद्रपूर रस्त्यावरील कॅबल स्टँड उंच पुलाच्या पोचमार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण, चौपदरीकरण व विद्युत वाहिनींचे स्थलांतरण करणे 5 कोटी 50 लक्ष रुपये अशी 55 कोटी 50 लक्ष रू. किंमतीची विकासकामे मंजूर करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील रस्ते व पुलाच्या बांधकामाची कामे मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मार्गी लागल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.