अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विशेष युवा मंडळ विकास अभियान

अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी विशेष युवा मंडळ विकास अभियान

भंडारा दि. 3 : नेहरू युवा केंद्र भंडारा तर्फे “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत “युवा मंडळ विकास कार्यक्रम अभियाना” अंतर्गत तीन तालुकामध्ये भंडारा, लाखनी, पवनी या तालुक्यांचा समावेश करण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील 75 गावांना भेटी देऊन “हर घर तिरंगा” याचे प्रबोधन करण्यात येऊन सहभागी होण्यास आवाहन करण्यात येईल तसेच उर्वरित तालुक्यात 50 गावांमध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

12 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे समापन नवी दिल्ली येथे होणार आहे. या कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व सहभागी होण्यासाठी नेहरू युवा केंद्र, भंडारा चे 14 राष्ट्रीय स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत, असे जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य यांनी कळविले आहे.