भंडारा जिल्ह्यात लाखोंपर्यंत पोहचला सामाजिक न्यायाच्या योजनांचा जागर

भंडारा जिल्ह्यात लाखोंपर्यंत पोहचला सामाजिक न्यायाच्या योजनांचा जागर

Ø जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

भंडारा, दि. 4 : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर कार्यक्रम राज्यातील लाखो जनतेपर्यंत पोहोचला आहे. अमृत महोत्सव वर्षे तसेच 1 मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून राज्यातील प्रत्येक गावात योजनांची माहिती पोहोचविण्याचे उद्दिष्ट जागर कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाने ठरविण्यात आले होते. योजनांची माहिती व प्रसारासाठी विभागाने युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली होती. प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात विभागाच्या योजनांची माहिती पुस्तके, माहिती पत्रिका पोहोच करण्यात आली होती.

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाणी मुख्य ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांचे हस्ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांना समाज कल्याण विभागा कडून विविध योजनांची माहिती दिली जात होती.  महाराष्ट्र दिनी राज्यात एकाच दिवशी बहुतांश ठिकाणी एकाच वेळी झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाखो लोकांपर्यंत योजनांची माहिती उपलब्ध झाली आहे.

झेंडा वंदनाच्या कार्यक्रम स्थळी  सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहिती पत्रिका तसेच माहिती पुस्तिका वाटप करण्यात आली. विभागाच्या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा यामागचा उद्देश असल्याचे  तसेच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती पालकमंत्री महोदयांनी आपल्या भाषणामध्ये प्रामुख्याने दिली.  दरम्यान आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमाचे समाजातील सर्व स्थरातून कौतुक झाले आहे.

मा. पालकमंत्री महोदयांनी समाज कल्याण विभागाचे उपक्रमाबद्दल अभिनंदन केले व उपस्थित असलेल्या सर्वांना विभागाच्या योजनांची माहिती करून दिली. कार्यक्रमास भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री. संदीप कदम, जिल्हा पोलीस अधिक्षक मा. श्री. वसंत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. भंडारा मा. श्री. विनय मून, मा. श्री. आर. डी. आत्राम, उपायुक्त तथा सदस्य तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे, तसेच म. फुले आर्थिक विकास महा., सा. र. लो. शा.अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महा., इतर मागासवर्ग आर्थिक विकास महा., संत रविदास चर्मोद्योग आर्थिक विकास महा., वसंतराव नाईक विजाभज आर्थिक विकास महा., दिव्यांग आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक व इतर अधिकारी यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला व संपूर्ण जिल्ह्यात कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. जिल्ह्यात प्रथमच अभिनव पद्धतीने शासनाच्या वतीने असा उपक्रम राबविण्यात आल्याने समाजातील सर्व स्तरातून विभागाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबरच बार्टीचे प्रकल्प अधिकारी, तालुका समन्वयक, समता दूत हे भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत व गावागावात पोहोचले होते त्यांनी योजनांची माहिती जनतेला करून दिली.

अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळालेला  कार्यक्रमात सहभागी झालेले जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी कर्मचारी यांचे सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण भंडारा यांनी आभार व्यक्त केले आहे.