जागतिक जल दिन–वातावरण चॅम्पियन बना
पाण्याचा उपयोग समजदारीने करा आणि आपला पर्यावरण वाचवा
राष्ट्रीय वातावरणातील बदल व मानवी आरोग्य या कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद मार्फत दिनांक 22 मार्च 2024 ला जागतिक जागतिक जल दिवस साजरा करण्यात येत आहे.
आज 22 मार्च, आजचा दिवस जागतिक जल दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. पाणी ही सजीवांची मूलभूत गरज आहे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जगू शकत नाही. पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र नाही. पण आज जगभर पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पूर्वी मुबलक स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या पाण्याची आज मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत आहे.
पाण्याचे महत्व अनन्य साधारण आहे. पाणी बचत ही काळाची गरज बनली आहे. यामुळेच पाण्याच्या बचतीसाठी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने १९९२ मध्ये झालेल्या अधिवेशनात २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर २२ मार्च १९९३ रोजी पहिल्यांदा जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. ब्राझीलची राजधानी रियो डी जिनोरियो येथे पहिला जल दिन साजरा करण्यात आला. पाणी बचतीसाठी जगभरात जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
२२ मार्च हाच दिवस जागतिक जल दिन म्हणून निवडण्यामागे कारणही तसेच आहे. २२ मार्च पासून वातावरण बदलास सुरवात होते. त्यामुळे तात्विक दृष्ट्या पावसाळ्याची सुरवात होण्यासाठी हा दिवस कारणीभूत ठरतो. हा तर्क वापरुन हा दिवस निवडण्यात आला आहे. पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७१ टक्के इतके असले तरी पिण्यायोग्य पाणी अल्प प्रमाणात आहे. वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यास हे पाणी कमी पडत आहे. पाणी ही सजीवांची मूलभूत गरज असली तरी इतर सजीव पाण्याच्या अपव्यय करित नाहीत मानव मात्र पाण्याचा मोठा अपव्यय करतो, गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतो. पाणी वापराचे नवनवीन मार्ग मानव शोधीत असतो त्यामुळे पाण्याची तीव्रता जाणवते.
हवामान बदलामुळे पावसाच्या पद्धतीत झपाटयाने बदल होत आहे. पूर्वी नियमित येणारा पाऊस आता बेभरवशाचा झाला आहे. पावसाचे दिवस आणि पावसाचे प्रमाणही कमी होत चालले आहे. त्यामुळे दुष्काळाचे प्रमाणही वाढले आहे. जागोजागी बोअरवेल घेऊन जमीनीखालील पाणीही मानवाने संपवले आहे त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळेच कदाचित पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल असा अहवाल काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाने दिला आहे. २०२५ पर्यंत जगातील एक तृतीयांश देशात पाणी पेटणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले आहेत.
आशिया खंडाबाबत सांगायचे झाले तर भारतात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. भारतात मार्चच्या सुरवातीलाच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागतात. दरवर्षी ४० टक्के गावांत दुष्काळ असतो. महाराष्ट्रातील मराठवाडा सारख्या विभागात तर दरवर्षी दुष्काळ असतो. लातूर सारख्या शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागतो. ग्रामीण भागात तर भीषण पाणी टंचाई जाणवते. अनेक गावांत टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. एकदा आलेला टँकर आठ दिवसांनीच पुन्हा येतो. काही गावात तर एका महिन्यात एकदाच पाणी मिळते. हंडाभर पाण्यासाठी महिलांना कैक किलोमीटरची पायपीट करावी लागते.
पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. कृत्रिम पाणी तयार करण्यात अजूनही शास्त्रज्ञांना यश आले नाही म्हणूनच आहे त्या पाण्याची बचत करणे हेच आपल्या हातात आहे. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. पाण्याची बचत करूनच आपण पाणी टंचाईवर मात करू शकतो. जल है तो कल है… या उक्तीनुसार येणारा काळ सुखकर करायचा असेल तर पाण्याची बचत करावीच लागेल. आजच्या दिवशी प्रत्येकाने पाणी बचतीचा संकल्प करून पाणी बचतीसाठी प्रयत्न केला तरच जागतिक जल दिनाचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल.
पाणी दिवस साजरा करण्याच्या कल्पना
- नद्या, तलाव आणि किनारी भागातील कचरा आणि प्रदूषक काढून टाकण्यासाठी, पाण्याची गुणवत्ता आणि पर्यावरणीय आरोग्य सुधारण्यासाठी सामुदायिक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करा.
- जलसंवर्धन, शाश्वत पाणी व्यवस्थापन पद्धती आणि जल कारभाराचे महत्त्व याबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी शैक्षणिक कार्यशाळा आणि चर्चासत्र आयोजित करा.
- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, कमी सेवा नसलेल्या समुदायांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छता सेवा प्रदान करण्यासाठी कार्यरत स्थानिक उपक्रम आणि संस्थांना समर्थन द्या.
- व्यक्ती आणि व्यवसायांना पाणी-बचत पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करा, जसे की गळती दूर करणे, पाणी-कार्यक्षम उपकरणे वापरणे आणि पावसाचे पाणी साठवण प्रणाली लागू करणे.
- दीर्घकालीन पाण्याची सुरक्षा आणि लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी धोरणातील बदल आणि पाण्याच्या पायाभूत सुविधा, पाणलोट संरक्षण.नागरिकांनी खालील उपाययोजना करण्याकरता आरोग्य विभाग आव्हान करीत आहे.विनाकारण चालू असलेला नळाला बंद करा.आपल्या घरातील फ्लश किंवा पाईपलाईन मधून पाणी लिकेज होत असेल तर त्वरित दुरुस्त करून घ्या.
आपली सायकल बाईक व कारला पाईपच्या पानांनी न धुता ओल्या कपड्याने साफ करावे. फळ आणि भाज्यांना धुण्यासाठी उपयोगात आलेल्या पाण्याचा उपयोग परसबागेमध्ये झाडांना टाकावे. एसी व आरो मधून जो पाणी व्यर्थ निघतो त्याला गाडी धुण्याकरता पोहोचा लावण्याकरता व भांडे साफ करण्याकरता किंवा झाडांना टाकण्याकरता उपयोग करावे.आपल्या सभवातील झाडांचे रक्षण करा व आपल्या पर्यावरणाचा पर्यावरण वाचवा.
आपल्या पर्यावरण वाचवण्याकरता पाण्याचा उपयोग व्यवस्थितपणे करावे अशी आवाहन आरोग्य विभाग जिल्हा परिषद भंडारा मार्फत करण्यात येत आहे.