चिचडोह बॅरेज पाणीसाठा करण्याकरिता प्रकल्पाचे सर्व दरवाजे बंद करणे बाबत

चिचडोह बॅरेज पाणीसाठा करण्याकरिता प्रकल्पाचे सर्व दरवाजे बंद करणे बाबत

गडचिरोली, दि.19: वैनगंगा नदीवर, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यामधील चिचडोह बॅरेजचे मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, नागपूर यांनी मंजूर केलेल्या व्दार संचलन कार्यक्रमानुसार बॅरेजचे 15.00मीटर लांबीचे व 9.00 मी. उंचीचे 38 पोलादी दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजित आहे. त्या करीता दि. 15 ऑक्टोबर 2023 पासून सर्व दरवाजे व्दार संचलन कार्यक्रमानुसार (प्रथम नदी काठावरिल व क्रमाने क्रमाने नदीच्या मध्यभागातील व्दारे) क्रमाने क्रमाने बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदी पात्रात उर्ध्व बाजुस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होणार आहे आणी नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. वाढलेल्या पाणीसाठयामुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून, सर्व लगतचे गावांना/ ग्रामपंचायतींना सुचना देण्यात येते की, त्यांनी आपले गावक-यांना, याबाबत दवंडी व्दारे सुचीत करावे व नदी काठावर जाणे टाळण्याच्या तसेच नदीकाठावरिल शेतांमध्ये कामे करतांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात. या प्रकल्पाकरीता कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, चंद्रपूर या कार्यालयामार्फत ज्या शेतांचे भुसंपादन/ सरळ खरेदी करण्यात आलेली आहे व करण्यात येत आहे, त्या सर्व भुधारकांनी शेतातील कामे करतांना खबरदारी घ्यावी तसेच प्रकल्पाचे बुडीत क्षेत्रासाठी संपादीत केलेल्या शेतांमध्ये शेतींची कोणतीही कामे करू नयेत. सर्व मासेमारी करणारे व पशुपालक यांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये. रेती घाटातून रेती काढणारे आणि नदीपात्रात इतर काम करणा-यालोकांनी खबरदारी घ्यावी. अन्यथ: होणा-या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. असे कार्यकारी अभियंता, गडचिरोली पाटबंधारे विभाग, गडचिरोली यांनी कळविले आहे.