जिल्हाधिकाऱ्यांनी केली पूरग्रस्त गावांची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पूरग्रस्त गावांची पाहणी

चंद्रपूर, दि. 21 : काल रात्रीपासून मुल तालुक्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मूल तालुक्यातील हळदी , दहेगाव ,नलेश्वर या गावांना भेट देऊन पूर परिस्थितीचे पाहणी केली. तसेच आवश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन तालुक्यातील सर्व नागरिकांना दिलेले आहेत.

यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम तसेच तहसीलदार रवींद्र होळी व ठाणेदार सुमित परतेकी, नायब तहसीलदार ओमकार ठाकरे, यशवंत पवार नंदकिशोर कुमरे आणि तलाठी महेश कडवलवार महेश पेंदोर, व इतर कर्मचारी उपस्थित होते.