बकरी ईद व आषाळी एकादशी निमीत्त जिल्हयाची शांतता समिती बैठक घेण्यात आली.

भंडारा शांतता कमेटी / जातीय सलोखा समीती सदस्य मिटींग

बकरी ईद व आषाळी एकादशी निमीत्त जिल्हयाची शांतता समिती बैठक घेण्यात आली.

यावेळी मा. जिल्हाधिकारी भंडारा श्री. योगेश कुंभेजकर मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, सहायक पोलीस अधीक्षक साकोली, श्री. सुंशात सिंग, सहायक पोलीस अपर अधीक्षक तुमसर श्रीमती रश्मीताराव उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा श्री. डॉ. अशोक बागुल, उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी, श्री. मनोज सिडाम, मुख्य अधिकारी नगर परिषद भंडारा श्री. विनोद जाधव, डिस्टीक हेल्थ ऑफीसर डॉ. नंदागवळी उपस्थितीत होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्री. अशोक बागुल उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा यांनी शांतता समिती व जातीय सलोखा अबाधित राहण्याकरीता प्रास्ताविक देवुन वरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. जातीय सलोखा व शांतता समिती सदस्य श्री गफ्फार भाई (लाखनी) यानी थोडक्यात मनोगत व्यक्त केले.

सण उत्सव येतात ते शांतता पूर्वक झाले पाहीजे. याकरीता जातीय सलोखा / शांतता समिती बैठक घेतली जाते.

मुस्लीम बांधवांच्या सणात जे कुर्बानी दिली जाते. त्याकरीता जे शासनाचे प्रतिबंधक ठरवुन दिले जाते त्याचे

पालन मुस्लीम बांधवानी करावे.

२) श्री. ईश्वर दयाल काबरा भंडारा अपना भारत देश सभी जाती धर्मासे सजा सुवा है, व एकमेक के त्योहारोका आदर करता है, ३) खान सर पवनी भंडारा जिल्हा हा शांतता प्रिय जिल्हा आहे. पवनी विदर्भाची काशी मानली जाते. हिंदु व 1 मुस्लीम सण हे एकाच दिवशी येत आहेत. बक-याची कुर्बानी देत असतांनी त्याचा त्रास दुस-यांना होणार

नाही. या गोष्टीकडे लक्ष देवुन सर्व मुस्लीम बांधवांनी लक्ष दयावे.

४) संजय एकापुरे सारे भारतीय माझे बांधव आहेत या विचारांनी सर्वानी वागणुक करावी. येणारे एकादशी व

बकरी ईद शांततेत पार पाडावे.

५) श्रीमती इंद्रायणी कापगते. शांतता हा पोलीस विभागाचा नाही तर जिल्हयातील सगळयाची जवाबदारी आहे. ६) युवराज उके यांनी सर्व धर्माचे लोकांना समाणतेची वागणुक दिली पाहीजे. एकमेकांनवर दडपन आणण्याचा

प्रयत्न करु नये. सांप्रदायीक हे नेहमी त्रासदायक असते.

जातीय एकोपा अबाधित राहावे. याकरीता श्री. गफ्फार भाई लाखनी यांनी श्री. ईश्वरदयाल काबरा यांना शाल व

पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. श्री. ईश्वरदयाल काबरा यांनी श्री. गफ्फार भाई लाखनी यांचे शाल व पुष्पगुच्छ

देवुन स्वागत केले. सदर कार्यक्रम हे विष्णु लोणारे अंधश्रध्दा निमुर्लन समिती यांचे संकल्पनेतुन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाची प्रास्तावना मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी यांनी जिल्हयातील जनतेला सोशल मिडीयावर आक्षेपार्ह येणारे मॅसेज समोर फॉरवर्ड करु नये. असे गुन्हे करणारा व्यक्ती आढळुन आल्यास लगेच पोलीस स्टेशनला माहीती दिली पाहीजे. मुस्लीम बाधवांना सांगीतले की, सणादरम्यान जे बकरेची बळी देतात. ते बंदीस्त जागेमध्ये देण्यात यावे. इतर लोकांची भावना दुखावली जाणार नाही. याकडे लक्ष दयावे. तसेच आषाढ़ी एकादशीची मिरवणुक शांततेने पार पाडावे. जातीय सलोखा अबाधित रहावे. हया करीता पोलीस विभाग सज्ज आहे.

मा. जिल्हाधिकारी भंडारा मा. श्री. योगेश कुंभेजकर यांनी भंडारा जिल्हा हा शांततेचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. सोशल मिडीयाचा वापर करुन त्याचा गैरवापर करु नका, बकरी ईदच्या वेळी जनावरांची कत्तल केली जाते. तेव्हा पशुसंवर्धन विभागाची परमिशन घ्यावी. व आषाढी एकादशीची मिरवणुक शांततेने पार पाडावे. कायदयाची अंमलबजावणी करण्याकरीता सर्वानी प्रशासनाला सहकार्य करावे.

उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा श्री. डॉ. अशोक बागुलयांनी आभार प्रदर्शन करुन मा. जिल्हाधिकारी

साहेबांचे अनुमती घेवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सर्व उपविभागीय अधिकारी भंडारा, तसेच राखीव पोलीस अधीकारी श्री. चौधरी, जिल्हयातील पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी / कर्मचारी, व जिल्हयातील शांतता समिती सदस्य, पत्रकार बंधु व ईतर मान्यवरउपस्थित होते.