27 जुलै पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू

27 जुलै पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू

भंडारा, दि. 14 : जिल्ह्यात 13 ते 27 जुलै 2022 या कालावधीत राजकीय संघटना व राजकीय पक्ष त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने धरणे/आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 13 जुलै पासून ते 27 जुलै 2022 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी महेश पाटील यांनी संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.