स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत 17 ऑगस्ट रोजी समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत 17 ऑगस्ट रोजी समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम

Ø जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 11 ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्कार व्हावे, या उद्देशाने 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत राज्यात स्वराज्य महोत्सवातंर्गत विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कार्यालयात समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रमाला उपस्थित रहावे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही यावेळी ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत म्हणावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.