पुलाचे बांधकाम सुरू न केल्यास रस्ता रोको आंदोलन, आमरण उपोषण करणार व होणाऱ्यां निवडणुकीवर बहिष्कार टाकणार 

पुलाचे बांधकाम सुरू न केल्यास रस्ता रोको आंदोलन, आमरण उपोषण करणार व होणाऱ्यां निवडणुकीवर बहिष्कार टाकणार 

मौजा विरव्हा ता. सिंदेवाही जिल्हा. चंद्रपूर येथील उमा नदीवर बरेच दिवसांपासून पूल मंजूर झालेला आहे. आणि पुलाची या पूर्वी दोनदा निविदा निघालेली आहे. परंतु अजून पर्यंत पुलाचे बांधकामास सुरुवात झालेली नाही.

पुलाचे बांधकाम सुरु न झाल्यामुळे जनतेला रहदारी करिता खूप स्त्रास सहन करावा लागतो आहे. विरव्हा, सरडपार चक येथील शेतकर्यांना शेतीचे काम करण्याकरिता नदी पात्रामधून पुरुष जीव धोक्यात घालून नेहमी ये-जा करावी लागते. पावसाळ्यात नदी नेहमी भरून वाहत असल्यामुळे सरडपार चक ते विरव्हाचे शेतकर्याना शेती करण्याकरिता जवळपास १५ किलो. मीटर अंतर पायपीट करावे लागते. खरीपाचे सिजनमध्ये सरडपार चक ते राजोली, पेटगाव, बाम्हणी माल, इटोली ते विरव्हा असा १५ किलो. मीटर दरोज फेरफटका मारावा लागतो. तसेच विद्यार्थाना कालेज करिता किवा तहसील कार्यालयाला ये-जा करण्याकरिता नाहक स्त्रास होते आहे.

विशेष हे कि विरव्हा गावाचे पूनर्वसन झाल्यामुळे विरव्हा हे गाव तीन भागात विभागलेले आहे (विरव्हा, सरडपार चक, बाम्हणी माल) आणि त्यांचे शेत विरव्हा या गावाच्या हद्दीत आहे. सरडपार चक व विरव्हा यांचे मध्ये उमा नदीवर पूल मंजूर झालेले आहे. तसेच पेटगाव पुला लगत कोल्हापुरी बंधार्याचे बांधकाम झाल्यामुळे त्याचे पाणी सरडपार चक व विरव्हा घाटा पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे शेतकर्यांना ये-जा करता येत नाही याचा परिणाम शेत पिकावर व जनतेवर होतो वेळेच्या अभावी शेतीचा हंगाम वेळेवर होत नाही व उत्पन्नास घट व आर्थिक नुकसान सहन करावी लागते. यापूर्वी नदीच्या पात्रात ये-जा करीत असताना यापूर्वी दोन व्यक्तींना नदीच्या प्रहावात जीव गमवा लागला सदर व्यक्ती गुरे चारण्याकरिता व शेतीच्या कामा करिता गेली होती. या पूर्वी कितेक निवेदन देवून अनेक निविदा निघून सुद्धा पुलाचे बांधकाम चालू होत नाही आहे,  पेटगाव कोल्हापुरी बंधाऱ्याचे नोहेंबर ते जून महिन्या पर्यंत नदीत पाणी साचून राहत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्याकरिता नाहक त्रास होत आहे त्यामुळे मौजा विरव्हा, सरडपार चक गावातील नागरिक रस्ता रोको आंदोलन, आमरण उपोषण, येणा-या निवडणूकीसाठी बहिष्कार टाकानार असल्याचे प्रशासनाला निवेदनाद्वारे चेतावणी दिली आहे