मनातलं पान :- भाग – 1
लेखक – मनोज मेश्राम
आज कित्येक दिवसांनी मन अगदी कस भरून आलं बघ… आकाशात अचानक ढग जमा व्हावीत आणि धरतीवर सोसाड वाऱ्यानी पाऊस व्हाव अगदी तसच, प्रदीर्घ काळानंतर सुद्धा तू स्मरणातून कधी गेलीसच नाहीस. नवलंच आहे… खर तर तू स्मरणातून कधी गेलीसच नाहीस. कदाचित कायम तुझे अस्थीत्व माझ्यातचं असतीलच. म्हणून तू स्मरणातून कधी कधी गेलीसच नाही.
आता रात्रीचे दोन वाजलेत पण मला झोप येत नाही. घडून गेलेला तो आयुष्यातला भूतकाळ एखाद्या चलचित्रपटा सारखा डोळ्यासमोर असतो. ठरवलं होत तुझं माझं सारं काही विसरून जावं, पण नाही. आजतागायत मी तुला विसरू शकलो नाही. तू माझी नाहीस ही कल्पना ही मी सहन करू शकत नाही. तू कालही माझीच होतीस आणि आजही. आयुष्याचा खूप मोठा प्रवास केल्यानंतर मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मला तूच दिसतेच. बाकी काही नाही… आयुष्यात काय कमवलं आणि काय गमवलं, याचा हिशोब लागत नाही. मला काहीच का आठवत नाही. फक्त तू आणि तूच…
आज माझ्या मनाने आकांत मांडलाय, आता वादळ सुटलाय. ठरवलं मी कुणाशी बोलणार नाही म्हणून पण माफ कर मला, मी दिलेला शब्द नाही पाळू शकलो. आज माझ्या मनाने विद्रोह चं केलाय. प्लिज खूप दिवसा पासून मनात साचलेलं रित्त करू दे मला. यानंतर काही मागणार नाही तुला. नाही म्हणू नकोस, शपथ आहे तुला, मी केलेल्या प्रेमाची…
कारण या नंतर मी या जगात असेन, कदाचित नसेलही… एकदा सांगू दे ते सारं काही… तुझं माझं. तुझ्यावर केलेलं ते निस्सीम प्रेम. त्या प्रेमाने न्हाऊन टाकायचं होत मला पण सॉरी… ही खंत अजुनही जगू देत नाही मला. मी आज आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. म्हणून शेवटची ईच्छा. मी आज या जगाला आणि तुला ही सारं काही इथभूत सांगणार आहे, सांगू मला. आता तू नाही म्हणू नकोस. मनात साचलेलं रित्त करू दे मला. क्रमशः










