सिंदेवाही चालक-मालक संघटनेचे तहसीलदार ठाणेदार मार्फत परिवहन मंत्री भारत सरकार यांना निवेदन

सिंदेवाही चालक-मालक संघटनेचे तहसीलदार ठाणेदार मार्फत परिवहन मंत्री भारत सरकार यांना निवेदन

सिंदेवाही- ” हिट अँड रण कायदा रद्द करणे बाबत.” सिंदेवाही तालुक्यातील चालक-मालक संघटनेचे सिंदेवाही चालक-मालक संघटनेचे तहसीलदार ठाणेदार मार्फत मा. पंतप्रधान भारत सरकार, नवी दिल्ली.भारत. गृहमंत्री भारत सरकार, नवी दिल्ली भारत. परिवहन मंत्री भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हंटले आहे की, अपघात घडल्यास जखमींना मृत्युच्या दारी सोडून पळून जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे मुळीच नाहि. परंतु अपघात झाल्यावर वाहन चालकाच्या मनात इमानदारीने अपघात ग्रस्तांना मदत करण्याची इच्छा असताना ही विनाकारण वाहनचालकाला होणारी मारहाण वाचावण्यासाठी वाहन चालक पळून जातात, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रा मधे जन्मजात असल्याकारणाने आणि आपल्या भारत देशा मधे दलित आणि आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरतूद आहे. तशा एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला नसल्या कारणाने ड्रायव्हर हा केवळ स्वतःच्या जिवाच्या भितीने आपघात स्थळावरुण पलायन करतो.
करीता ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची प्रथमतः अंमलबजावणी करणे आणि त्या नंतर हिट अँड रन या नवीन कायद्या मधे कारावासाचा कालावधी व आर्थिक दंड या मधे कमी करुण त्या नंतरच कायदा लागू करणे हि विनंती.
सदर कायदा रद्द करण्यात यावा अन्यथा रास्ता रोको आनंदोलन शिवाजी चौक सिंदेवाही येथे करण्यात येईल.
सदर आंदोलन दरम्यान कोणतीही अनुसूचित प्रकार घडून आल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.