प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

रब्बी हंगाम २०२२ मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.

गडचिरोली,दि.06: प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचारासाठी जिल्हयात कृषी रथाला श्री. बसवराज मास्तोळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचा मार्गदर्शनाखाली आबासाहेब धापटे (कृषी उपसंचालक) व शितल खोबरागडे तंत्र अधिकारी(सांख्यीकी) गडचिरोली यांच्या हस्ते हिरवी झंडी दाखवून प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२२-२३मध्ये राबवण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजना शासन भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातुन गडचिरोली जिल्हयात राबविण्यात येत आहे. सदर योजनेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी फसल बीमा सप्ताह १ ते ७ डिसेंबर या कालावधीत कृषीरथाव्दारे तालुका स्तरावरील विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी व कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी विमा योजनेबाबत विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत, जेणेकरुन अधिसुचित महसूलमंडळातीलविमाधारकशेतकऱ्यांचेप्रतिकुल परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळू शकणार आहेत. सदर रथाला दिनांक ५ डिसेंबर २०२२ रोजीजिल्हा स्तरावर हिरवी झेंडी दाखवून व्यापक जनजागृती करण्याचे आव्हान बसवराज मास्तोळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आबासाहेब धापटे (कृषी उपसंचालक) व शितल खोबरागडे तंत्र अधिकारी(सांख्यीकी) गडचिरोली यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमायोजना खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना खरीपहंगाम २०२० पासुन तीनवर्षा करीता राबविण्याची मान्यता देण्यात आली होती. तथापी केंद्रशासनाच्या सुचनेनुसार यंदा एकावर्षा करीता Cup & Cap model (80:110) नुसार राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

योजनेची उददीष्टये- नैसर्गिक आपत्ती किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषि क्षेत्रासाठीच्या पत पूरवठयात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषिक्षेत्राच्या गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.

योजनेची वैशिष्टये – कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजना फक्त अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी लागू आहे. कुळाने किंवा भाडेपटटीने शेती करणारे शेतकरी पात्र आहेत. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.

जोखमीच्या बाबी –पिकांच्याहंगामामध्येहवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Mid Season Adversity), पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपिट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Localized Calamities), नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान (Post Harvest Losses), प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम सन 2022-23 मध्ये गडचिरोली जिल्हयामध्ये भारतिय कृषि विमा कंपनी कंपनीकडून राबविण्यात येईल.

योजनेअंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम तपशील खालीलप्रमाणे असून, विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार आहे. तथापि, रब्बी हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांना भरावयाचा प्रति हेक्टरी विमा हप्ता दर 1.5 टक्के तसेच रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला असून पुढीलप्रमाणे आहे.

 

विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता:-

पिकाचे नाव- गहू बागायत, अधिसुचित महसुल मंडळ- कुरखेडा, कढोली, पुराडा, मालेवाडा(तालुकाकुरखेडा), विमा संरक्षित रक्कम प्रती हे. (रुपये)- 27500/- , शेतकऱ्यांने सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर (रुपये), 412.50 रु, ज्वारी जिरायत, गडचिरोली, पोर्ला, ब्राम्हणी, येवली, पोटेगाव (तालुकागडचिरोली) आरमोरी, देऊळगाव, वैरागड, पिसेवडधा (तालुकाआरमोरी) चामोर्शी, कुनघाडारै, भेंडाळा, घोट, येनापूर, आष्टी (तालुकाचामोर्शी) मुलचेरा, लगाममाल (तालुकामुलचेरा) सिरोंचा,ब्राम्हणी,पेंटीपाका,असरअल्ली (तालुकासिरोंचा) अहेरी,आलापल्ली, खमनचेरु,जिमलगटटा,पेरमीली,कमलापूर (तालुकाअहेरी), 22500/-,337.50 रुपये,

हरभरा, कुरखेडा, कढोली, मालेवाडा, पुराडा (कुरखेडातालुका) वडेगाव, कोटगुल कोरची, म्हसेली (कोरचीतालुका)

आरमोरी, देऊळगाव, वैरागड, पिसेवडधा (आरमोरी तालुका), 20000/-, 300 रुपये, उन्हाळी भात, कुरखेडा तालुका सर्व महसूलमंडळ,आरमोरी तालुका सर्व महसूलमंडळ,सिरोंचा तालुका सर्व महसूल मंडळ,वडसा तालुका सर्व महसूलमंडळ, 37500/-रुपये, 562.50 रुपये, सर्व शेतकऱ्यांनी दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पूर्वी रब्बी ज्वारी,१५ डिसेंबर पुर्वी गहू बागायत, हरभरा व ३१ मार्च २०२२ पूर्वी उन्हाळी भात पिकासाठी पिक विमा भरुन योजनेत सहभाग घ्यावा अधिक माहितीसाठी नजीकचे तालुका कृषि अधिकारी / उपविभागीय कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.