दिनांक २५ मे २०२२ रोजी पर्यंत सादर प्रस्ताव समितीने निकाली काढल्याबाबत तसेच त्रृटी पुर्ततेकरीता अर्जदार समितीस उपस्थित राहणेबाबत

दिनांक २५ मे २०२२ रोजी पर्यंत सादर प्रस्ताव समितीने निकाली काढल्याबाबत तसेच त्रृटी पुर्ततेकरीता अर्जदार समितीस उपस्थित राहणेबाबत

गडचिरोली, दि.07: सन २०२१-२२ या सत्रातील शैक्षिणक, सेवा, निवडणूक व इतर प्रयोजनार्थ ज्या (अनुसूचित जाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इमाव व विमाप्र )उमेदवारांनी जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव दिनांक २५ मे २०२२ रोजी पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,गडचिरोली येथे सादर केलेले होते ते सर्व प्रकरण निकाली काढण्यात आलेले आहेत (त्रृटीचे प्रकरण वगळून.) तरी सर्व अर्जदारांनी स्वत:चा ई मेल आय.डी वर व बार्टी कार्यालयाचे https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून आपली जात वैधता प्रमाणपत्राची रंगीत कॉपी काढून घ्यावी परंतु ज्यांना अद्यापपर्यंत ई – मेलव्दारे जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसल्यास सदर प्रस्तावामध्ये जाती दावा सिध्द करणारे सबळ पुरावे नसल्याने त्यांचे प्रकरण त्रृटीमध्ये असल्याने त्यांना यापुर्वी दुरध्वनी, भ्रमणध्वनी व पत्राव्दारे त्रृटी पुर्तता करणेसंदर्भात कळविण्यात आले आहे. मात्र, ज्या अर्जदारांनी अद्यपाही त्यांचे जाती दावे पडताळणी संबंधीत आवश्यक ते मानीव दिनांकापुर्वीचे जातीचे व वास्तव्याच्या नोंदीचे पुरावे सादर केलेले नाहीत,अशा अर्जदारांना उमेदवारांना त्रृटी पुर्ततेकरीता संधी देण्यात येत असून, त्यांनी त्रृटी पुर्ततेबाबत आवश्यक ते मानीव दिनांकाचे पुरावे मुळ प्रतीसह सादर करणेसाठी कळविण्यात आले आहे. त्रृटीपुर्ततेकरीता सबळ पुराव्यांसह समिती कार्यालयात दिनांक १२ जुलै.२०२२ रोजी तसेच दर मंगळवारी उपिस्थत राहावे. असे आवाहन उपायुक्त श्री. दे. ना. धारगावे यांनी केले आहे.