कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना / शेत जमिन विक्रीकरीता अर्ज आमंत्रित.”

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

शेत जमिन विक्रीकरीता अर्ज आमंत्रित.”

भंडारा,दि.22 : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील लोकांचे उत्पन्नाचे साधन वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा.तसेच त्यांचे मजुरीवर असलेले अवलंबीत्व कमी होऊन त्यांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे,या करिता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन सन 2004 पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमिहीन शेतमजुरासाठी राबविण्यात येत आहे.

जिल्हयात या योजनेकरिता ज्या शेतकऱ्यांना शासकीय दराने शेती विकायची आहे.त्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, भंडारा यांचेकडे त्वरीत अर्ज सादर करावे.अर्जचा नमुना कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहे. शेती किमान 2 एकरी ओलितखाली किवा 4 एकर कोरडवाहू असावी. शेतजमीन खरेदीचा कमाल मर्यादा नाही.जिरायती शेतीसाठी 5 लाख प्रति.एकर व बागायतीसाठी 8 लक्ष प्रति एकर इतकी कमाल मर्यादा शेतजमीन सुपिक व कसण्यायोग्य असावी. शेतजमीनीवर कर्जाचा बोजा नसावा.याकरिता नाहरकत प्रमाणपत्र 7/12 उतारा जोडणे आवश्यक, एकापेक्षा जास्त भोगवटदाराचे नाव असल्यास संमतीपत्र आवश्यक तसेच शेतजमिन विक्री बाबतचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक शेतजमिनीवर वित्तीय बोजा नसल्याबाबतचे तलाठी याचे प्रमाणपत्र आवश्यक शासनाने वाटप केलेली, गायरान,धार्मिक स्थळ, रस्ते/पादन यामध्ये जाणारी बुडीत क्षेत्र,पुनर्वसन क्षेत्रात,प्रकल्प/कालवा, कोणत्याही बाबीकरीता शेतजमिन संपादीत झाली असल्यास किंवा सर्वे झाल्यास जमिन विक्री करता येणार नाही.करीता अर्ज करु नये,तलाठी यांचे निंबाधित प्रमाणपत्र आवश्यक 10) शेतजमिन विक्री प्रस्ताव ज्या गावातील तलाठी यांनी दिलेला मागील मागील 5 वर्षाचा खरेदी-विक्री दरांचा तक्ता जोडणे आवश्यक आहे. शेतजमिनीची क्षेत्रफळ बरोबर असल्याबाबतचे भूमी अभिलेख यांचे टाचन व नकाशाह अहवाल आवश्यक,जमिनीची क्र प्रत शेतमालकाने सादर करणे आवश्यक आहे.शेतजमिण विक्रीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरीय समितीमार्फत शेतजमिनीची पाहणी करण्यात येईल.इत्यादी अटी शेर्ती अधिन राहून ज्या शेतकऱ्यांना शासकीय जमिन विक्री करायची आहे.त्यांनी जमिन विक्रीचा अर्ज सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मामाजिक न्याय भवन ,जिल्हा परिषद चौक,भंडारा कार्यालयात संपर्क साधावा व शेतजमिन विक्री करण्याबाबतचा अर्ज सादर करावे असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण भंडारा विभागानी कळविले आहे.